अन् वीस वर्षांनी एकत्र आले माजी विद्यार्थी .... चाकणच्या विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा चाकण: शाळा , कॉलजचे दिवस संपले की प्रत्येकजण आपआपल्या करिअरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो. मात्र , ज्या शाळेमध्ये , ज्या कॉलेजमध्ये आपण शिकलो , लहानाचे मोठे झालो , वेगवेगळ््या भागातील विद्यार्थ्यांबरोबर आपण मैत्रीचे नाते जोडले , ती नाळ मात्र तशीच असते. सर्वांना एकदा भेटावे , एकमेकांशी हितगुज करावे , असे सर्वांना वाटते. मात्र वीस वर्षांचा मोठा कालखंड लोटल्या नंतर प्रत्येकजण आपआपल्या नोकरीधंद्यात व्यस्त असल्याने ते सहजासहजी शक्य होत नाही. मात्र , ते अशक्यही नसते हे चाकणच्या शिवाजी विद्यालयातून १९९५ साली उत्तीर्ण होऊन गेलेल्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले . आणि तब्बल वीस वर्षांपूर्वीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. ज्या शाळेत आपण लहानाचे मोठे झाले , ज्या मातीने आपल्याला घडवलं , आयुष्य जगण्याचे तंत्र मंत्र दिले त्या भूमीत पुन्हा ए...